Thursday 17 March 2016

हिन्दू महासभा का असफल झाली ? लेखक उपन्यासकार गुरुदत्त


  हिन्दू महासभे ने संगठनात्मक कार्य रा.स्व.संघ वर सोपवून केवळ राजकारणाकडे लक्ष केंद्रित केले होते.जनमत संघटन शक्ती च्या जोरावर चालते तर राजकारण बौध्दिक आधारा वर ! स्वराज्य प्राप्ति पूर्व देशाचे राजकारण कांग्रेस च्या हाती होत तर, संघ कांग्रेस पोषक बनला होता !
       सन १९४५ मेरठ च्या संघ शिबिरात गोलवलकर गुरुजी नी गाँधी ची उघड उघड प्रशंसा केली होती. त्या काळात संघ बौध्दिक हिन्दू मत-मतान्तर यावर भर देणारे होते, निर्मोही अखाडा चे नागा साधू समर्थ श्री रामदास स्वामी यांची प्रेरणा घेतली जात होती. राम-कृष्ण चे नाव देशाच्या काना कोप्र्यात घेतले जात होते. त्यांनी इस्लाम चा विरोध केला पण इस्लामी राजकारण विरोधात त्यांचा प्रभाव शून्य होता. अतः संघाचे बौध्दिक नाममात्र आणि जातीचे शरीर बचाव संगठन झाले, त्याला आता राजनीती म्हणतात. हेच कारण आहे कि, स्वराज्य मिळत्या वेळी २०-२५ लक्ष स्वयंसेवक असतांना सुध्दा संघ कांग्रेस चा विरोध देश विभाजन प्रसंगी करू शकला नाही. शरणार्थी हिन्दू जनते च्या रक्षणाचा प्रयत्न होत राहिला. परन्तु,संघ जनसामान्य चे आन्दोलन होवू शकले नाही.आमच मत आहे कि, संघ आन्दोलन स्वराज्याच्या पार्श्व भूमी वर कुठलाही प्रकारचा प्रभाव उत्पन्न करू शकला नाही.
              स्वराज्याच्या उपरांत, विशेषतः १९४८ साली संघ अवैधानिक घोषित केल्या नंतर काही संघ कार्यकर्त्यांच्या मनात राजकीय प्रभाव असावा अशी भूमिका निर्माण झाली होती. त्यावेळी संघ चे सहस्त्रो स्वयंसेवक आणि गुरूजी बंदीगृहात होते. काही लोकांच्या मनात आल की कांग्रेस चा विकल्प शोधला पाहिजे आणि संघाला एक राजनितिक संस्थेत बदलण्याचा विचार उत्पन्न झाला. पं.मौलिचन्द्र शर्मा संघ आणि सरकार यांत मध्यस्थ भूमिका बजावत होते. (या दरम्यान गुरूजी-पटेल यांची कारागृहात भेट झाली.) गुरूजी नी संघ केवल सांस्कृतिक कार्य करील ! अशी घोषणा केली आणि या आश्वासन? नंतर प्रतिबन्ध हटला. आतल्या आत राजकीय महत्वाकांक्षा प्रदीप्त होत होती , एक राजनितिक दल जो संघ पोषित असेल असा बनविला पाहिजे, उ.भा.संघ चालक वसंतराव ओक  (ज्यांनी हिन्दू महासभा भवन देहली मध्ये संघ शाखा लावणे आरंभले होते.) संघ राजनीतीत असावा असे दृढ़ मानत होते. त्यांचा सम्पर्क हि सामान्य हिन्दू जनते सोबत व्यापक होता. (या दरम्यान हिंदू महासभा केंद्रीय मंत्री श्यामा प्रसाद मुखर्जीचा नेहरू विरोध आणि हिन्दू महासभा शब्दातून हिन्दू शब्द काढून टाकण्याचा दबाव प्रस्ताव प्रकट झाला.)

             संघ नेत्यांनी हिन्दू महासभा बरोबर उलट व्यवहार आरंभल्याचे स्पष्ट झाले. जिथे हिन्दू महासभा हिंदुत्व ची राजनीती चालवू पाहत होती, तिथे संघ केवल मात्र हिन्दू नावावर संगठन विस्तारात सफलता प्राप्त करण्याचा प्रयत्न करत होता. मुखर्जी नी मंत्री मंडल मधून त्यागपत्र देताच ओक आणि अन्य राजनितिक उद्दिष्ट बाळगणारे संघ नेता त्यांना भेटू लागले. ओक यांना संघ नेतृत्व नी पसंत केल नाही. श्री. बलराज मधोक या दिवसात श्रीनगर येथे प्राध्यापक होते. कश्मीर मध्ये  पाकिस्तान ची घुसपैठ सुरु झाली तेव्हा तेथील जनतेचे मनोबल तुटू दिले नाही धैर्य दिल. संघ नेता राजकारण पासून पृथक राहण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होते. तरी हि १९५१ कानपुर मध्ये भारतीय जनसंघ चे महामंत्री पदावर ओक नियुक्त होणार असतांना त्यांच्या ऐवजी संघ कार्यकर्त्ता पं.दीनदयाल उपाध्याय ना पुढे केले गेले. त्याकाळात ते कोणती हि ख्याति प्राप्त नव्हते. अश्या प्रकार ची शंका व्यक्त केली जात होती कि, जेव्हा कधी जनसंघ कांग्रेस च्या विरुध्द एक बलशाली राजनितिक दल बनते तेव्हा संघ अधिकारी त्यांचे पाय ओढत. परिणाम असा होत होता कि जे लोक हिन्दू विचारधारेच्या पोषण साठी इथे येतात त्यांना प्रभावी बनू दिल जात नव्हत , अतः हा पक्ष संघ ची उपसमिति मात्र होवून राहिली आहे.

       प्रश्न हा आहे कि,हिन्दू सांस्कृतिक विचार सरणीच्या पक्षाचे राज्य या देशात असावे कि नाही ?  याची नितांत आवश्यकता आहे. एक प्राचीन, अति श्रेष्ठ, मानव जातीच्या उन्नत्ति चे साधन जे या देशाच्या मनीषींनी आपला त्याग आणि तपस्या द्वारे जिवंत ठेवला आहे.त्याला जिवंत ठेवण्यासाठी,हिंदुत्व ची राजनीती प्रचलित व्हायला हवी. जी आता देशात नाही.

           राजनितिक आंदोलनांवर अधिकार मिळविणे सफलतेच साधन आहे.हिंदुत्व ची वास्तविक गौरवाची स्पष्ट रुपरेखा डोळ्या समोर ठेवून हिंदुत्वाला एक राष्ट्र रूप द्यायला हवे. त्यांत मुख्यतः गुण,कर्म,स्वभाव च्या आधारावर राजनीती प्रचलित केली जावी. जाती च्या प्राचीन मान्यतेवर  आघाता पासून रक्षणासाठी राज्यसत्ते च  सञ्चालन झाल पाहिजे.

     वर्तमान परिस्थितीत अबुध्द विचारधाराचे शासन चाललय. त्याचा विरोध केलाच पाहिजे. संपूर्ण हिन्दू समाजाला सांस्कृतिक आधार देण असंभव आहे परन्तु अभारतीय असुरी शिक्षणाच्या व्यापक प्रचारास रोखून हिन्दू समाजाचा व्यापक आधार बनविण्याच्या प्रयत्नात योगदान दिल पाहिजे.
        हिन्दू संघठनांनी मिळून एक संयुक्त कार्यक्रम बनविला पाहिजे ; एक सांस्कृतिक आणि एक राजनितिक दिशे ने.रोटी-कपड़ा-मकान या शारीरिक आवश्यकता असून तो जीवनाचा एक न्यून अंश आहे . जाति ची संस्कृति जी शरीर, इन्द्रिय आणि मन यांच्या वर आहे, तिला लक्ष करा. आपली धर्म स्थल-तीर्थ वा दर्शनीय वस्तु या गौण आहेत. त्यांच्या मुळाशी जो विचार आहे, तेच मुख्य आहे आणि ते बुध्दी चे विषय आहे. करिता जाति ना निम्न बिंदूंवर संगठित केल पाहिजे.
 १) परमात्मा २) जीवात्मा ३) कर्मफल ४) पुनर्जन्म ५) धर्म चे दहा नियम ६) आत्मना प्रतिकूलानि परेषां न समाचरेत ७)  बुध्दी चे पथ प्रदर्शन ८) सामाजिक व्यवहारात समाज अधीन परन्तु, व्यक्तिगत व्यवहारात स्वतंत्रता ९) परित्राणाय साधुनाम विनाशाय च दुष्कृताम् १०) या सर्व साठी संयम आणि तपस्या ; हाच कल्याणांचा मार्ग आहे आणि या कल्याणातच हिंदुत्व आहे . हिंदुत्व हे अध्यात्मिक, वैज्ञानिक मान्यता आणि व्यवहार आहे ! सद्बुध्दी आणि स्व रक्षणाचा मार्ग भारत भू मंडल तथा मानवते ची रक्षा करण्याचा मार्ग आहे.
 * सन्दर्भ ग्रन्थ-हिंदुत्व की यात्रा-ले.गुरुदत्त "शाश्वत संस्कृति परिषद्" ३०/९० कनोट सरकस,नयी दिल्ली-१

No comments:

Post a Comment